'उपवास' हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. विविध सणावारांना किंवा अगदी काहीजण आठवड्यातून किमान एकदा उपवास करतात. धार्मिक कारणासोबतच उपवास करण्याचे काही आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. त्यामुळे आहाराचे पथ्यपाणी आणि आरोग्याकडे पुरेसे लक्ष देऊन उपवास केल्यास या '4' कारणांसाठी उपवास करणं फायदेशीर ठरू शकतं .. डीटॉक्सिफिकेशन - आयुर्वेदानुसारही अनेक आजारांचं मूळ हे शरीरात साचून राहणारे घातक/विषारी घटक हे आहे. त्यामुळे उपवास केल्याने पोटाला आराम मिळतो आणि घातक घटक बाहेर पडण्यास मदत होते. पचनसंस्थेचे कार्य सुधारते - फळं आणि हलका आहार घेऊन उपवास केल्यास पचनकार्यालाही चालना मिळते. पचनसंस्थेवर आलेला दाब थोड्या प्रमाणात हलका करण्यास मदत होते. मन शांत होते